माध्यमिक लोकशिक्षणं मंडळ सिन्नर , संचलित ,
विद्यार्थी ,पालक, शिक्षक हे कोणत्याही संस्थेचे अविभाज्य घटक आहेत ,ते समाजापासून वेगळे होऊ शकत नाही .ह्या तीनही घटकांमधील संवाद सुरू व्हावा .यासाठी ही संस्था ,शाळा नेहमीच उपक्रम राबवत असते. शाळेचे प्रयत्न समाजा पर्यंत पोहोचवावेत ,त्याचबरोबर समाजातील वेगवेगळ्या सर्जनशील उपक्रमांची संवाद साधावा यासाठी एस.जी.पब्लिक स्कूल नेहमीच प्रयत्नशील असते. संस्थेच्या पन्नास वर्षाच्या वाटचालीत नवनिर्मितीचा आनंद, त्यासाठी चाललेली अखंड धावपळ ,सतत काहीतरी नवनिर्मिती करण्याची ऊर्मी, कल्पकतेने तयार होणाऱ्या संकल्पनेच्या पूर्तीसाठी, डोंगराएवढे काम करताना सतत सर्वांच्या पाठीमागे घट्ट पाय रोवून ताकद देणारे संचालक मंडळ व शाळेचे व्यवस्थापन पाहणारी कुशल व्यवस्थापक मुख्याध्यापक यांचे नेतृत्व नेहमीच सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांनां मार्गदर्शन व प्रेरणादायी ठरणारे असे आहे .कोणतेही काम नेटाने वेळेत करण्याच्या वृत्तीमुळे शाळेची प्रगती दिवसेंदिवस वाढतच आहे .शिक्षण व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन आहे. शिक्षकांच्या मध्ये असणारे गुणांच्या विकासाबरोबर त्यांचे शिकवणे अधिक समृद्ध होत गेले पाहिजे .आपण विद्यार्थ्यांनां बरोबर घेऊन शिक्षण प्रक्रिया सोपी करू शकतो. हे विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी जवळीक साधत अध्ययन-अध्यापन सर्जनशील झाले आहे .या सर्व शैक्षणिक प्रक्रियेत पालकांच्या उत्स्फूर्त सहभाग व आपल्या पाल्याची सर्वांगीन प्रगती पाहून, झालेला आनंद त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांमधून जाणवतो .एस.जी. संकुलाचे शैक्षणिक प्रयोग ,उपक्रम ,इतर कार्यक्रम, सर्व शिक्षण प्रेमी पर्यंत पोहोचावे. आणि इतरांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरावे यासाठीच हा लेखन प्रपंच. 1992 साली सिन्नर तालुक्यातील पहिल्या व एकमेव आधुनिक शैक्षणिक व भौतिक सुविधा युक्त एस.जी.पब्लिक स्कूलची स्थापना केली .मा.श्री सूर्यभान गडाख (नानासाहेब) यांच्या दुरदृष्टीने विचार करून तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या मुलांना शहरी सोयी उपलब्ध करून दिल्या ,इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला गेला .
पुढील वाटचालीस संस्थेची प्रगती होत असतानाच ,संस्थेचे सेक्रेटरी मा. राजेशजी गडाख साहेब व संचालक मंडळ ,मा.मुख्याध्यापक श्री.उदय कुदळे सर , शिक्षक, विद्यार्थी हे नवीन नवीन बदल स्वीकारण्यास नेहमी तत्पर असतात. यामधील काही ठळक बाबींचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते .
*डिजिटल तंत्रज्ञान स्मार्ट क्लास*
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न पाहत असतानाच शाळेत संस्थेचे सेक्रेटरी मा. राजेश गडाख सर यांच्या स्मार्ट संकल्पनेतून डिजिटल तंत्रज्ञान शाळेत उपलब्ध करून दिले .डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर या शाळेचे खास वैशिष्ट्य आहे .सर्वच वर्गात स्मार्ट क्लास एस.जी.किड्सच्या विद्यार्थ्या पासून ते बारावीपर्यंत विद्यार्थीं अध्ययनाचे धडे गिरवताना दिसतात .शिक्षकांना अध्यापन करणे सुलभ झाले. ऑनलाईन माहिती सर्च करून आपले अध्ययन अनुभव विद्यार्थी दृढ करतात .आता सर्व शाळा डिजिटल तंत्रज्ञानाकडे वाटचाल करताना दिसत असताना दहा वर्षापूर्वीच मा.राजेश गडाख सर यांनी ई लर्निंग डिजिटल तंत्रज्ञान राबवले असून ,अद्यावत ज्ञान विद्यार्थी घेत आहे .
*शाळेचे आणखीन काही वैशिष्ट्ये*
*सहशालेय व सांस्कृतिक कार्यक्रम*
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेत नेहमीच असे विविध उपक्रम राबवले जातात .वर्षभरातील भारतीय संस्कृती मधील विविध सण ,उत्सव, परंपरा नुसार चालणारे वैशिष्ट्यपूर्ण असे उपक्रम शाळेत राबवले जातात. वैज्ञानिक दृष्टीकोनातून महत्त्व सांगून नव्याचा ध्यास व जुन्या परंपरांचा अट्टाहास न करता मुलांना उपयुक्त ठरेल या दृष्टीने महत्त्व देऊन सण उत्सव साजरे केले जातात .यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असा उत्सव म्हणजे बैलपोळा होय.बैलपोळा सण साजरा करताना शहरी मुलांना ग्रामीण जीवनाची माहिती व्हावी. बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून समाजात एकता राखण्यासाठी हे सण उत्सव कशी उपयोगी ठरतात हे प्रत्यक्ष देखाव्यातून सादर केले जाते .शेतीची अवजारे ,शेतकरी बांधवांकडून आणली जातात. समाजात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केला जातो .उदाहरणार्थ कांदा भाव प्रश्न ,समृद्धी महामार्ग चा प्रश्न, शेती वाचवा ,शेतकरी वाचवा ,यासारखा ज्वलंत प्रश्नावर समाज जागृती करण्यावर भर असतो.
*सहशालेय शैक्षणिक सहली व क्षेत्रभेट*
एस.जी संकुल म्हणजे अध्ययन अनुभवांची खानच, हे जेवढे परिसरातून घेता येईल तेवढे ज्ञानाचे अनुभवाचे कण येथील विद्यार्थी वेचण्यासाठी नेहमीच आतुर असतो .त्याचाच एक भाग म्हणजे क्षेत्रभेट होय.शाळेत जून पूर्वीच वर्षभराचे नियोजन करून त्याप्रमाणे सिन्नर व जवळपासची ठिकाणे निवडली जातात .त्यामध्ये साखर कारखाना ,पवनचक्की, ईशानेश्वर मंदिर, आर्टिलरी सेंटर नाशिक, तारांगण ,उत्पादक कारखाने, नगरपालिका ,पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस ,बँका अशा ठिकाणांची निवड करून मुलांचे ज्ञान बाह्य जगताशी दृढ करण्यावर भर असतो .याप्रमाणेच वर्षभरातून एकदा विविध ठिकाणी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. शिवनेरी ,औरंगाबाद दर्शन, पुणे दर्शन ,प्राणीसंग्रहालय तसेच कोल्हापूर ,सातारा ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळे दाखवून विद्यार्थ्यांचे अनुभव पाठ्यपुस्तकातील अध्ययन-अध्यापनाशी सांगड घालण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. त्यामुळे मुलांचे जीवना अनुभव समृद्ध होतात. मंत्रालय, विधान भवन ,राजभवन यासारखे मुबई येथील राजधानी मधील ठिकाणे दाखवून प्रत्यक्ष कारभार कसा चालतो, त्याचे व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना सहलीतून दिले जाते
*दिनविशेष*
शाळेमध्ये नेहमी राष्ट्रीय थोर महापुरुषांच्या जयंती ,पुण्यतिथी उत्सव व वर्षाभरातील विविध दिनविशेषाचे नियोजन करून प्रत्यक्ष जबाबदारी वाटप करून कारवाई केली जाते .वर्षारंभी नियोजन असल्यामुळे प्रत्येक वर्ग शिक्षकांना व विद्यार्थ्यांनां नियोजन करणे सोपे जाते. या कार्यक्रमात विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करतात. सभाधीटपणा वाढण्यास मदत होते .थोर पुरुषांची ओळख होते, त्यांचे कार्य समजते.
*माझी शाळा, माझा फळा*
हे संकुलाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे येथील दर्शनी भागातील पडवीत असलेले 15 फळे होईल हे सर्व फलक नेहमीच नवीन नवीन दिनविशेष यानुसार रंगीत खडूने रंगवले जातात. त्यावर बोलकी चित्र काढून, शाळेतील वातावरण चैतन्यमय असते .शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री चतुर बापू व अन्य सहकारी शिक्षक विनायक काकुळते हे नेहमीच फलक लेखन करीत असतात .त्यामुळे विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणा व मार्गदर्शन मिळत असते .त्यांचा चित्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. निरीक्षण क्षमता वाढते .
*सुंदर शाळा, स्वच्छ शाळा*
शिस्त, स्वच्छता, टापटीपपणा या त्रिसूत्रीचा वापर करून स्वच्छ शाळा सुंदर शाळा या मंत्राची नेहमीच येथे प्रत्यक्ष कारवाई होताना दिसते .रोजच्या रोज सर्व सतरा तुकड्यांमध्ये आठवड्याच्या वाराप्रमाणे स्वच्छता मोहीम राबवली जाते. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे शाळेचे सौंदर्य नेहमीच रमणीय असते.
*विविध स्पर्धांचे आयोजन*
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा यासाठी शाळेत नेहमी शाळा अंतर्गत व बाह्य स्पर्धा आयोजित केले जातात. त्यात विद्यार्थी भाग घेऊन बक्षीस पटकवतात. यामध्ये नवनीत चित्रकला स्पर्धा ,विविध शासकीय स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा, रंगभरण स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,काव्यवाचन स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा, आकाश कंदील बनवणे ,पतंग महोत्सव तसेच मा. नानासाहेब गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. रांगोळी स्पर्धा भरवल्या जातात ,राखी बनवणे स्पर्धा ,यासारखे स्पर्धा राबवून मुलांच्या कल्पकतेला वाव देण्यास चालना दिली जाते. वार्षिक पारितोषिक कार्यक्रमात बक्षिस पात्र विद्यार्थानां सन्मानित केले जाते.
*संगीत, खेळ ,कला शिक्षण*
शाळेतील संगीत क्लास विद्यार्थ्यांसाठी एक मेजवानीच असते आठवड्यांचे तासिका नियोजन करून संगीत दालनात विद्यार्थी नेहमी जाण्यास तयार असतात .तबला-पेटी यांचे शास्त्रीय पद्धतीने ज्ञान दिले जाते. तसेच कलेचीही चित्रकला मुलांचा आवडता विषय आठवड्यातून प्रत्येक तुकडीला तासिका वाटप करून त्याप्रमाणे चित्रकलेची तास घेतले जातात. विविध खेळ , क्रीडा शिक्षक शिकवत असतात.
*सुंदर शाळा ,हरित शाळा*
जशी घराची पारख घरासमोर अंगणावरून होते ,तसेच शाळेचे बाह्य स्वरूपावरून आतील अंतरंग शाळेचे सहज समजते. शाळेचे बाह्य परिसरात झाडे लावून सर्व परिसर हरित झाला आहे दोन एकर जागेत फळ लागवड करून आंबा वड नारळ चिकू अशा फळांची झाडे लावून शाळेची शोभा वाढली आहे. विद्यार्थ्यांना सोबत घेऊन लहानपणीच वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन यांचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात.
*पालक मेळावा*
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रथम प्राधान्य देऊन ,त्यांच्या ज्ञानार्जानासाठी पालक-शिक्षक यामध्ये सुसंवाद साधावा यासाठी पालक मेळाव्याचे आयोजन केले जाते .प्रत्यक्ष पेपर दाखवून विद्यार्थी चुका लक्षात आणून दिल्या जातात .शनिवार हा पालक भेटीचा दिवस ठरवून, पालकांच्या समस्या सोडवल्या जातात.
*विज्ञान मेळावा*
वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा ,वैज्ञानिकता जागृत व्हावी. यासाठी विज्ञान मेळावे आयोजित केले जाते. प्रात्यक्षिक ,प्रयोग करून विद्यार्थी शाळेतील सायन्स हॉलमधील प्रात्यिक्षिकाचा अनुभव घेतात .राज्यस्तरापर्यंत येथील विज्ञान मॉडेल ची निवड झाली असून जिल्हास्तर व तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शनात प्रथम द्वितीय क्रमांक पटकावले आहे.
*शालेय प्रतिनिधींची निवड*
शाळा भरण्याच्या वेळी वर्षारंभी विद्यार्थ्यांमधून शालेय प्रतिनिधींची निवड प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया घेऊन राबवली जाते .प्रत्यक्ष मतदान करून ,सभा प्रचार घेऊन, उमेदवार निवडले जातात. राजकीय रंग न देता ,वैचारिक पातळीवर कसे निवडून यावे. यासाठी धडे दिले जातात. मत मोजणी पद्धत शिकवली जाते.निकाल घोषित करून सन्मानपत्र बहाल केले जाते,वर्षभरातील सर्व कार्यक्रमांसाठी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून उपस्तिती असते.
*ज्ञानरचनावादी अध्यापन*
शाळेतील विद्यार्थ्यांना समजपूर्वक आकलन व्हावे. यासाठी शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष वस्तू हाताळून विद्यार्थी ज्ञानरचनावादी पद्धतीने अध्ययन करतात.
अशा विविध उपक्रम राबवले जात असतानाच, सर्व वर्गात सेमी इंग्रजी पध्दतीने अध्यापन केले जाते.तज्ञ व्यक्ती बोलावून मुलांना मार्गदर्शन घडवून आणले जाते. आजच्या स्पर्धेच्या युगात नवनवीन आव्हाने स्वीकारत असताना, तंत्रज्ञानाच्या जगतामधील विद्यार्थी टिकला पाहिजे ,तो शिकला पाहिजे व जीवनात यशस्वी जगला पाहिजे. यासाठी एस.जी.पब्लिक स्कूल हे नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेऊन तालुक्यातील विद्यार्थ्यांनां घडवत राहिल .सिन्नर तालुक्याच्या विकासातील एक घटक बनण्याचा सतत प्रयत्न करेल.
शब्दाकंन-श्री.बापू कारभारी चतुर
यंशवंतनगर सिन्नर
एस. जी. पब्लिक स्कूल प्राथमिक विभाग सिन्नर
आज महाराष्ट्रात औद्योगिक नगरी म्हणून नावारूपास येत असलेल्या सिन्नर नगरीच रूप बदलत चाललेले आहेत. मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग ,उच्च शिक्षित वर्ग सिन्नर उपनगरात स्थायिक आहे. नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर, नवीन शैक्षणिक विचारप्रवाहांचे बदलते स्वरूप ,हे आजच्या जीवनशैलीचे वैशिष्ट्ये बनत चालले आहे .त्यानुसार विविध शैक्षणिक संकुले बदलत आहे. नवीन नवीन डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करताना विद्यार्थी गुणवत्ता पूर्ण शिक्षणाकडे वाटचाल करताना दिसायला पाहिजे. याप्रमाणेच त्यांचा विकास होण्यासाठी सिन्नर मधील एस .जी .पब्लिक स्कूल नेहमीच प्रयत्न करीत असते .शाळा ही आनंददायी व अर्थपूर्ण अनुभव देणारी असावी या हेतूने माध्यमिक लोक शिक्षण मंडळ संचलित एस. जी .पब्लिक स्कूल प्राथमिक /माध्यमिक विभाग सिन्नर मध्ये अखंडपणे कार्य करत आहे .या वाटचालीत संस्थेने काळाची पावले ओळखून नेहमीच नवीन नवीन उपक्रम विचारपूर्वक राबवते ,शिक्षण जीवनानुभव देणारे असावे. यासाठी नेहमी प्रयत्न करत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. सिन्नर भूषण सूर्यभान गडाख (नानासाहेब )यांनी माध्यमिक लोक शिक्षण मंडळ सिन्नर या संस्थेची स्थापना केली .विद्यार्थी ,पालक, शिक्षक हे कोणत्याही संस्थेचे अविभाज्य घटक आहेत ,ते समाजापासून वेगळे होऊ शकत नाही .ह्या तीनही घटकांमधील संवाद सुरू व्हावा .यासाठी ही संस्था ,शाळा नेहमीच उपक्रम राबवत असते. शाळेचे प्रयत्न समाजा पर्यंत पोहोचवावेत ,त्याचबरोबर समाजातील वेगवेगळ्या सर्जनशील उपक्रमांची संवाद साधावा यासाठी एस.जी.पब्लिक स्कूल नेहमीच प्रयत्नशील असते. संस्थेच्या पन्नास वर्षाच्या वाटचालीत नवनिर्मितीचा आनंद, त्यासाठी चाललेली अखंड धावपळ ,सतत काहीतरी नवनिर्मिती करण्याची ऊर्मी, कल्पकतेने तयार होणाऱ्या संकल्पनेच्या पूर्तीसाठी, डोंगराएवढे काम करताना सतत सर्वांच्या पाठीमागे घट्ट पाय रोवून ताकद देणारे संचालक मंडळ व शाळेचे व्यवस्थापन पाहणारी कुशल व्यवस्थापक मुख्याध्यापक यांचे नेतृत्व नेहमीच सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांनां मार्गदर्शन व प्रेरणादायी ठरणारे असे आहे .कोणतेही काम नेटाने वेळेत करण्याच्या वृत्तीमुळे शाळेची प्रगती दिवसेंदिवस वाढतच आहे .शिक्षण व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन आहे. शिक्षकांच्या मध्ये असणारे गुणांच्या विकासाबरोबर त्यांचे शिकवणे अधिक समृद्ध होत गेले पाहिजे .आपण विद्यार्थ्यांनां बरोबर घेऊन शिक्षण प्रक्रिया सोपी करू शकतो. हे विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी जवळीक साधत अध्ययन-अध्यापन सर्जनशील झाले आहे .या सर्व शैक्षणिक प्रक्रियेत पालकांच्या उत्स्फूर्त सहभाग व आपल्या पाल्याची सर्वांगीन प्रगती पाहून, झालेला आनंद त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांमधून जाणवतो .एस.जी. संकुलाचे शैक्षणिक प्रयोग ,उपक्रम ,इतर कार्यक्रम, सर्व शिक्षण प्रेमी पर्यंत पोहोचावे. आणि इतरांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरावे यासाठीच हा लेखन प्रपंच. 1992 साली सिन्नर तालुक्यातील पहिल्या व एकमेव आधुनिक शैक्षणिक व भौतिक सुविधा युक्त एस.जी.पब्लिक स्कूलची स्थापना केली .मा.श्री सूर्यभान गडाख (नानासाहेब) यांच्या दुरदृष्टीने विचार करून तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या मुलांना शहरी सोयी उपलब्ध करून दिल्या ,इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला गेला .
पुढील वाटचालीस संस्थेची प्रगती होत असतानाच ,संस्थेचे सेक्रेटरी मा. राजेशजी गडाख साहेब व संचालक मंडळ ,मा.मुख्याध्यापक श्री.उदय कुदळे सर , शिक्षक, विद्यार्थी हे नवीन नवीन बदल स्वीकारण्यास नेहमी तत्पर असतात. यामधील काही ठळक बाबींचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते .
*डिजिटल तंत्रज्ञान स्मार्ट क्लास*
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न पाहत असतानाच शाळेत संस्थेचे सेक्रेटरी मा. राजेश गडाख सर यांच्या स्मार्ट संकल्पनेतून डिजिटल तंत्रज्ञान शाळेत उपलब्ध करून दिले .डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर या शाळेचे खास वैशिष्ट्य आहे .सर्वच वर्गात स्मार्ट क्लास एस.जी.किड्सच्या विद्यार्थ्या पासून ते बारावीपर्यंत विद्यार्थीं अध्ययनाचे धडे गिरवताना दिसतात .शिक्षकांना अध्यापन करणे सुलभ झाले. ऑनलाईन माहिती सर्च करून आपले अध्ययन अनुभव विद्यार्थी दृढ करतात .आता सर्व शाळा डिजिटल तंत्रज्ञानाकडे वाटचाल करताना दिसत असताना दहा वर्षापूर्वीच मा.राजेश गडाख सर यांनी ई लर्निंग डिजिटल तंत्रज्ञान राबवले असून ,अद्यावत ज्ञान विद्यार्थी घेत आहे .
*शाळेचे आणखीन काही वैशिष्ट्ये*
*सहशालेय व सांस्कृतिक कार्यक्रम*
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेत नेहमीच असे विविध उपक्रम राबवले जातात .वर्षभरातील भारतीय संस्कृती मधील विविध सण ,उत्सव, परंपरा नुसार चालणारे वैशिष्ट्यपूर्ण असे उपक्रम शाळेत राबवले जातात. वैज्ञानिक दृष्टीकोनातून महत्त्व सांगून नव्याचा ध्यास व जुन्या परंपरांचा अट्टाहास न करता मुलांना उपयुक्त ठरेल या दृष्टीने महत्त्व देऊन सण उत्सव साजरे केले जातात .यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असा उत्सव म्हणजे बैलपोळा होय.बैलपोळा सण साजरा करताना शहरी मुलांना ग्रामीण जीवनाची माहिती व्हावी. बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून समाजात एकता राखण्यासाठी हे सण उत्सव कशी उपयोगी ठरतात हे प्रत्यक्ष देखाव्यातून सादर केले जाते .शेतीची अवजारे ,शेतकरी बांधवांकडून आणली जातात. समाजात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केला जातो .उदाहरणार्थ कांदा भाव प्रश्न ,समृद्धी महामार्ग चा प्रश्न, शेती वाचवा ,शेतकरी वाचवा ,यासारखा ज्वलंत प्रश्नावर समाज जागृती करण्यावर भर असतो.
*सहशालेय शैक्षणिक सहली व क्षेत्रभेट*
एस.जी संकुल म्हणजे अध्ययन अनुभवांची खानच, हे जेवढे परिसरातून घेता येईल तेवढे ज्ञानाचे अनुभवाचे कण येथील विद्यार्थी वेचण्यासाठी नेहमीच आतुर असतो .त्याचाच एक भाग म्हणजे क्षेत्रभेट होय.शाळेत जून पूर्वीच वर्षभराचे नियोजन करून त्याप्रमाणे सिन्नर व जवळपासची ठिकाणे निवडली जातात .त्यामध्ये साखर कारखाना ,पवनचक्की, ईशानेश्वर मंदिर, आर्टिलरी सेंटर नाशिक, तारांगण ,उत्पादक कारखाने, नगरपालिका ,पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस ,बँका अशा ठिकाणांची निवड करून मुलांचे ज्ञान बाह्य जगताशी दृढ करण्यावर भर असतो .याप्रमाणेच वर्षभरातून एकदा विविध ठिकाणी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. शिवनेरी ,औरंगाबाद दर्शन, पुणे दर्शन ,प्राणीसंग्रहालय तसेच कोल्हापूर ,सातारा ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळे दाखवून विद्यार्थ्यांचे अनुभव पाठ्यपुस्तकातील अध्ययन-अध्यापनाशी सांगड घालण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. त्यामुळे मुलांचे जीवना अनुभव समृद्ध होतात. मंत्रालय, विधान भवन ,राजभवन यासारखे मुबई येथील राजधानी मधील ठिकाणे दाखवून प्रत्यक्ष कारभार कसा चालतो, त्याचे व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना सहलीतून दिले जाते
*दिनविशेष*
शाळेमध्ये नेहमी राष्ट्रीय थोर महापुरुषांच्या जयंती ,पुण्यतिथी उत्सव व वर्षाभरातील विविध दिनविशेषाचे नियोजन करून प्रत्यक्ष जबाबदारी वाटप करून कारवाई केली जाते .वर्षारंभी नियोजन असल्यामुळे प्रत्येक वर्ग शिक्षकांना व विद्यार्थ्यांनां नियोजन करणे सोपे जाते. या कार्यक्रमात विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करतात. सभाधीटपणा वाढण्यास मदत होते .थोर पुरुषांची ओळख होते, त्यांचे कार्य समजते.
*माझी शाळा, माझा फळा*
हे संकुलाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे येथील दर्शनी भागातील पडवीत असलेले 15 फळे होईल हे सर्व फलक नेहमीच नवीन नवीन दिनविशेष यानुसार रंगीत खडूने रंगवले जातात. त्यावर बोलकी चित्र काढून, शाळेतील वातावरण चैतन्यमय असते .शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री चतुर बापू व अन्य सहकारी शिक्षक विनायक काकुळते हे नेहमीच फलक लेखन करीत असतात .त्यामुळे विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणा व मार्गदर्शन मिळत असते .त्यांचा चित्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. निरीक्षण क्षमता वाढते .
*सुंदर शाळा, स्वच्छ शाळा*
शिस्त, स्वच्छता, टापटीपपणा या त्रिसूत्रीचा वापर करून स्वच्छ शाळा सुंदर शाळा या मंत्राची नेहमीच येथे प्रत्यक्ष कारवाई होताना दिसते .रोजच्या रोज सर्व सतरा तुकड्यांमध्ये आठवड्याच्या वाराप्रमाणे स्वच्छता मोहीम राबवली जाते. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे शाळेचे सौंदर्य नेहमीच रमणीय असते.
*विविध स्पर्धांचे आयोजन*
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा यासाठी शाळेत नेहमी शाळा अंतर्गत व बाह्य स्पर्धा आयोजित केले जातात. त्यात विद्यार्थी भाग घेऊन बक्षीस पटकवतात. यामध्ये नवनीत चित्रकला स्पर्धा ,विविध शासकीय स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा, रंगभरण स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,काव्यवाचन स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा, आकाश कंदील बनवणे ,पतंग महोत्सव तसेच मा. नानासाहेब गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. रांगोळी स्पर्धा भरवल्या जातात ,राखी बनवणे स्पर्धा ,यासारखे स्पर्धा राबवून मुलांच्या कल्पकतेला वाव देण्यास चालना दिली जाते. वार्षिक पारितोषिक कार्यक्रमात बक्षिस पात्र विद्यार्थानां सन्मानित केले जाते.
*संगीत, खेळ ,कला शिक्षण*
शाळेतील संगीत क्लास विद्यार्थ्यांसाठी एक मेजवानीच असते आठवड्यांचे तासिका नियोजन करून संगीत दालनात विद्यार्थी नेहमी जाण्यास तयार असतात .तबला-पेटी यांचे शास्त्रीय पद्धतीने ज्ञान दिले जाते. तसेच कलेचीही चित्रकला मुलांचा आवडता विषय आठवड्यातून प्रत्येक तुकडीला तासिका वाटप करून त्याप्रमाणे चित्रकलेची तास घेतले जातात. विविध खेळ , क्रीडा शिक्षक शिकवत असतात.
*सुंदर शाळा ,हरित शाळा*
जशी घराची पारख घरासमोर अंगणावरून होते ,तसेच शाळेचे बाह्य स्वरूपावरून आतील अंतरंग शाळेचे सहज समजते. शाळेचे बाह्य परिसरात झाडे लावून सर्व परिसर हरित झाला आहे दोन एकर जागेत फळ लागवड करून आंबा वड नारळ चिकू अशा फळांची झाडे लावून शाळेची शोभा वाढली आहे. विद्यार्थ्यांना सोबत घेऊन लहानपणीच वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन यांचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात.
*पालक मेळावा*
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रथम प्राधान्य देऊन ,त्यांच्या ज्ञानार्जानासाठी पालक-शिक्षक यामध्ये सुसंवाद साधावा यासाठी पालक मेळाव्याचे आयोजन केले जाते .प्रत्यक्ष पेपर दाखवून विद्यार्थी चुका लक्षात आणून दिल्या जातात .शनिवार हा पालक भेटीचा दिवस ठरवून, पालकांच्या समस्या सोडवल्या जातात.
*विज्ञान मेळावा*
वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा ,वैज्ञानिकता जागृत व्हावी. यासाठी विज्ञान मेळावे आयोजित केले जाते. प्रात्यक्षिक ,प्रयोग करून विद्यार्थी शाळेतील सायन्स हॉलमधील प्रात्यिक्षिकाचा अनुभव घेतात .राज्यस्तरापर्यंत येथील विज्ञान मॉडेल ची निवड झाली असून जिल्हास्तर व तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शनात प्रथम द्वितीय क्रमांक पटकावले आहे.
*शालेय प्रतिनिधींची निवड*
शाळा भरण्याच्या वेळी वर्षारंभी विद्यार्थ्यांमधून शालेय प्रतिनिधींची निवड प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया घेऊन राबवली जाते .प्रत्यक्ष मतदान करून ,सभा प्रचार घेऊन, उमेदवार निवडले जातात. राजकीय रंग न देता ,वैचारिक पातळीवर कसे निवडून यावे. यासाठी धडे दिले जातात. मत मोजणी पद्धत शिकवली जाते.निकाल घोषित करून सन्मानपत्र बहाल केले जाते,वर्षभरातील सर्व कार्यक्रमांसाठी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून उपस्तिती असते.
*ज्ञानरचनावादी अध्यापन*
शाळेतील विद्यार्थ्यांना समजपूर्वक आकलन व्हावे. यासाठी शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष वस्तू हाताळून विद्यार्थी ज्ञानरचनावादी पद्धतीने अध्ययन करतात.
अशा विविध उपक्रम राबवले जात असतानाच, सर्व वर्गात सेमी इंग्रजी पध्दतीने अध्यापन केले जाते.तज्ञ व्यक्ती बोलावून मुलांना मार्गदर्शन घडवून आणले जाते. आजच्या स्पर्धेच्या युगात नवनवीन आव्हाने स्वीकारत असताना, तंत्रज्ञानाच्या जगतामधील विद्यार्थी टिकला पाहिजे ,तो शिकला पाहिजे व जीवनात यशस्वी जगला पाहिजे. यासाठी एस.जी.पब्लिक स्कूल हे नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेऊन तालुक्यातील विद्यार्थ्यांनां घडवत राहिल .सिन्नर तालुक्याच्या विकासातील एक घटक बनण्याचा सतत प्रयत्न करेल.
शब्दाकंन-श्री.बापू कारभारी चतुर
यंशवंतनगर सिन्नर
No comments:
Post a Comment